Wednesday, January 6, 2016

व्यक्तीनिष्ठा वा विचारनिष्ठा?

आज चर्चा करत असताना मित्रास म्हणालो "आपण माणूस बघून त्याचे विचार मान्य करतो आणि दुर्दैवाने विचारांकडे बघून माणसास मान्य करत नाही"

कितीही नाही म्हणलं तरी एखाद्या व्यक्तीस पूज्य रुपी मानून त्यास आपल्या डोक्यावर बसवणे हा मनुष्य स्वभावच आहे. अर्थात तो माणूस काहीतरी त्या क्षमतेचा असल्याशिवाय हे होणे शक्य नाही हेही मान्य! एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्या मनास भिडतात तेव्हाच आपण त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतो. जेव्हा त्या व्यक्तीचे अनेक विचार आपल्या मनांस पटावयास लागतात तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे आदराने बघू लागतो आणि त्याचे सगळेच विचार पटावयास लागतात तेव्हा आपण त्यास पूज्य रुपी मानून त्याचा कुठलाच शब्द खाली पडू देत नाही आणि त्याचा प्रत्येक विचार शिरसावंद्य मानून घेतो.

थोडक्यात ज्याचे विचार आपल्या मनास भिडतात म्हणून आपण ज्याचे ऐकावयास प्रारंभ केला त्याचे आपल्या नकळत सर्व विचार आपण श्रेष्ठ मानून तेच प्रमाण मानावयास सुरुवात करतो. हा केवढा विरोधाभास म्हणावा? आणि याच क्षणी वेड्या भक्तीस प्रारंभ होतो. आपले थोडीफार का होईना परंतु स्वतंत्र विचार करायचे जे सामर्थ्य असते ते आपण आपल्या नकळत हरवून बसतो. यात त्या विचारकर्त्याचा कुठल्याही परीने तोटा होत नसून आपण आपल्या स्वतंत्र विचारशैलीस ठेचीत असतो.

जेव्हा मनुष्य विचार हे प्रमाण मानावयास तयार असतो तेव्हा तो केवळ एका मनुष्याचे विचारच प्रमाण मानावयाची चूकभूल न करता सर्व विचारांस आपल्या मनाच्या दरबारी अगत्याचे आमंत्रण देऊन त्यांचा पाहुणचार करू शकतो आणि पुढल्या वेळेस कोणत्या विचारांस आपल्या ओसरी बाहेरचे स्थान द्यायचे आणि कोणत्या विचारास सन्मानपूर्वक वागणवूक द्यावयाची याचा ताळमेळ राखू शकतो आणि अशाच वेळेस विचार कर्त्यास महत्व न देता विचारास महत्व दिले जाते.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ज्याचे विचार योग्य आहेत त्याचे "सगळेच" विचार कायमच योग्य आहेत हे मानण्याचा दुराग्रह का? प्रत्येक गोष्टीत कमी जास्ती, योग्य अयोग्य हे चालायचेच. काही विचार अगदी आपल्यास पूजनीय असलेल्या व्यक्तीचे सुद्धा चुकीचे असू शकतात आणि काही विचार आपल्यास इतरार्थी न भावणाऱ्या व्यक्तीचे देखील योग्य असू शकतात परंतु ते मान्य न करण्याचा दुराग्रह का म्हणून ठेवावा?

एखाद्या व्यक्तीचा एखादा विचार मान्य न होणे म्हणजे ती संपूर्ण व्यक्तीच मान्य न होणे असा निष्कर्ष काढणे हे देखील आततायी पणाचे लक्षण मानावे. सूर्यावर सुद्धा काळे डाग आहेत, परंतु त्या डागांमुळे सूर्याची ओळख होत नाही, तर तो अवकाश आपल्या तेजाने व्यापून टाकतो म्हणून वंदनीय मानला जातो. 

श्रद्धा ही विचारांवर असावी की व्यक्तीवर? साहजिकच म्हणायचे झाले तर ती विचारांवर असावयास हवी. संकोचित वृत्ती धरून आमचेच ताट भरलेले असे एकदा मनाने पक्के केले की मग शेजारी पंचपक्वान्नांच्या जेवणाचे खुले आमंत्रण असून देखील आमच्या येथल्या ताटात एक तांदळाचे शीत जरी वाढले तरी त्यास मन पूर्ण आहार मानून मोकळे होते. हा दुराग्रह का ठेवावा?

मनुष्यास विचार करण्याची संपदा प्राप्त झाली असताना ती मनाची कवाडं कायम उघडी ठेवून सतत विचारांचा प्रवाह खेळता ठेवण्यात शहाणपण नाही काय?


जे जेथे ज्या रुपात आहे परंतु चांगले आहे ते पदरात घ्यावे; आणि जे वाईट, चुकीचे, कालबाह्य आहे ते कितीही हद्याच्या जवळचे असले तरी टाकून द्यावे. गैर गोष्टींना कवटाळून बसण्यात आपलेच नुकसान आहे हे लक्षात घ्यावे.

Saturday, January 2, 2016

अध्यात्म आणि राष्ट्रकारण

काल मित्राशी बोलताना अध्यात्म आणि राष्ट्रकारण यावर विषय निघाला. त्यावरचे माझे विचार खाली लिहीत आहे.

माझा तत्वज्ञानावर गाढ अभ्यास नाही परंतु तरी काही गोष्टी जरूर व्यक्त कराव्याशा वाटतात.
जरी आत्मज्ञान - अध्यात्म आणि राष्ट्रकारण या दोन गोष्टी वरवर एकमेकांपासून दूर आहेत असं भासत असेल तरी माझ्या मते ज्यास पूर्णतः राष्ट्रकारणामध्ये वाहून घ्यायचे असेल त्यास आत्मज्ञान आणि अध्यात्माची अनुभूती काही अंशी का होईना पण होणे फार गरजेचे आहे कारण अंतिमतः राष्ट्रकारणासाठी राष्ट्रीय अस्मिता असणे फार जरुरीचे आहे आणि ती अस्मिता हे त्या राष्ट्राच्या सहस्र आत्म्यांच्या विचारांचे एकत्रित रूप आहे त्यामुळे स्वतः ची ओळख झाल्याशिवाय राष्ट्राची खऱ्या अर्थाने पूर्णतः ओळख होणे जरा अवघडच! तरीही आपण नमूद केल्या प्रमाणे अध्यात्माचे सारेच नियम राष्ट्रकारणास लागू होणार नाहीत हेही खरेच! असे असले तरी राष्ट्रकारण निःस्वार्थ आणि खरोखरी राष्ट्रासाठी करण्यासाठी मुळात त्यात आपला कुठे स्वार्थ तर दडला नाही ना हे त्या राष्ट्रकारण करणाऱ्यास वेळोवेळी चाचपून नक्कीच पाहावे लागेल आणि एखादे कार्य वैयक्तिक अथवा ठराविक समुदायासाठी नसून राष्ट्रासाठीच आहे हे ओळखण्यासाठी अध्यात्म - स्वानुभव
याहून उत्तम मानदंड कोणता? तशा मानदंडाच्या पट्टीने जर का मोजमाप झाले तरच श्री कृष्णासारखे राष्ट्रकारण-राजकारण करणारे घडू शकतात अन्यथा भ्रष्ट आणि अंध राष्ट्रकारण करणारे हिटलर होण्यास विलंब नाही!


आणि राष्ट्रकारण करणाऱ्यास नक्कीच अशी काही पावले उचलावी लागतील ज्यास त्याची अध्यात्माची साधना विरोध करेल पण जर राष्ट्राचे त्यात भले होत असेल तर वैयक्तिक मानसिक द्वंद्वावर तो मनुष्य नक्कीच विजय प्राप्त करू शकेल आणि त्यांस न पटणारी परंतु आवश्यक असणारी पावले उचलण्यास सहकार्य करेल. आणि हाच त्यामागचा जागृत विचार त्यास होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यास बळ देईल. आणि ही गैर पावले आपद्धर्म म्हणून गणली जातील आणि शाश्वत धर्माच्या आचरणात बाधा आणणार नाहीत आणि शाश्वत धर्माच्या आचरणासाठी अध्यात्माची आवश्यकता नाही काय? श्री कृष्णांच्या बाबतीत हेच तर नाही झाले काय? ज्यांस शाप मिळाला असून देखील आपल्या मार्गाच्या आड त्यांनी तो शाप आणून दिला नाही कारण तो शाप वैयक्तिक होता परंतु त्यांचे कार्य राष्ट्रीय स्वरूपाचे होते आणि त्यामुळेच त्यांनी तो झेलला अशा त्या भूतीस अध्यात्मानीच तर सचेतन ठेवले नसेल काय?

Saturday, July 30, 2011

गेली २१ वर्षं - मराठी नाटक !!!

       कालच मित्रांबरोबर  "गेली २१ वर्षं" नाटक बघितलं. बरेच दिवस paper मध्ये वाचत होतो, लोकांकडून ऐकत होतो की ते फार भारी नाटक आहे आणि एकदा तरी निश्चित बघायलाच पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे जेव्हा त्याचा show होणार आहे असं कळलं तेव्हाच जायचं निश्चित केलं आणि नशिबाने ticket पण मिळालं. अपेक्षेप्रमाणे "खेळ" House-full होता आणि त्यातही जवळ जवळ सगळी मंडळी आमच्याच वयाची होती त्यामुळे जरा बरं वाटलं. 

     नाटकाची कथा नावाप्रमाणेच आहे, कथा एका २१ वर्षाच्या मुलाची आणि त्याच्या मनात येणाऱ्या विचारांची, त्याच्या मनाच्या घालमेलीची, त्याच्या मनात असलेल्या tension ची आणि एकंदरीतच जे जे काही त्या वाचा मुलाच्या मनात येईल, जे त्याला करावंसं वाटतं, जे तो करू शकला असता याची! निश्चितच आपण नाटक बघताना "तरुण" या नाटकातल्या प्रमुख पात्रामध्ये कुठे न कुठे आपल्याला स्वतःला पाहतो आणि त्यामुळेच तेनातक आपलासं होतं. दिग्दर्शकाचं, संवाद लेखकाचं मनापासून कौतुक त्यासाठी!!!!

     पण तरी खरा सांगू का, मला तरी अगदी मनापासून असं वाटलं की ते नाटक story ला पूर्ण वाव नाही देऊ शकलं. नाटकात ३ अंक होते. त्यातला पहिला अंक तर निव्वळ jokes आणि हसणं यात जातो आणि दुसऱ्या अंकात स्टोरी ला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, आणि माझ्या मताप्रमाणे त्यांनी हा वेळ वाया घालावला, असं नाही म्हणते की serious नाटक पूर्णवेळ serious च असायला पाहिजे पण शेवटी अशाप्रकारच्या नाटकात विनोदाला किती वाव द्यावा आणि खरंच तो तितका गरजेचा आहे का हे पण लक्षात घ्यायला हवं!

     आणि अजून गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, "कुठलीही" गोष्ट अथवा incident हा पूर्णपणे दाखवला गेला आहे असं मला तरी नाही वाटलं, ते प्रत्येक part त्यांनी दाखवला आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने दाखवू शकले असते असं सारखा वाटतं. कथा इतकी सुरेख आहे पण ती आपल्यासमोर तितक्या क्षमतेने सादर होते असं वाटत नाही.

    काही गोष्टींचा तर मला खरंच उलगडा नाही होत! "रघू" चं character का घेतला आहे? हे तर मला कळलंच नाही. कदाचित तो dashing, dude असा आहे म्हणून घेतलं असावं पण त्याची खरंच गरज होती का? TV वरचा एक anchor खरंच एवढा माणसाच्या खऱ्या आयुष्यात influential असतो का? आणि तो ही, एका सुशिक्षित कुटुंबातील, सुजाण मुलाच्या बाबतीत? नाही पटत मला तरी!!! अजून एक गोष्ट खटकते ती म्हणजे "चाफा" हे character. किती २१ वर्षांच्या मुलांच्या आयुष्यात त्या वयात मुली येतात आणि त्याही अगदी kissing पर्यंत?? त्यापेक्षा चाफा हे त्याच्या मनातला पात्र असतं तर जास्त योग्य वाटलं असतं.

     आता जरा नाटकाच्या शेवटाबद्दल, नाटकाचे २ शेवट दाखवले आहेत, एकामध्ये "तरुण" त्याच्या treatment नंतर बरा होतो आणि सामान्य माणसाप्रमाणे संसाराला लागतो, (हा शेवट माझ्या तरी मनाला जसता पटलं आणि त्याहून तो जास्तं practical आणि close to real life वाटला), सामान्य माणसाच्या मनात कितीही rebellious विचार आले तरी शेवटी तो कधी ना कधीतरी जीबनाच्या रहाटगाडग्यात अडकतोच आणि त्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नसतो, म्हणूनच माला हा शेवट ज्सती पटला. दुरा शेवट असा होता की ज्यात त्याला एकटं रहावसं वाटतं, बाहेर बघू नये असा वाटतं आणि आत्ममग्न व्हावं असा वाटतं. हे मला अजिबात पटलं नाही, आणि त्याचं कारण काही अंशी नाटकातच आहे, नाटकात एकावेळेस तो स्वत:च म्हणतो की प्रत्येक पिढीला त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येक माणसाला त्याचे प्रॉब्लेम्स असतात वगैरे, मग असं असूनसुदधा आणि हे मान्य असूनसुद्धा त्याची ही अवस्था का होते? प्रॉब्लेम्स तर प्रत्येकालाच असतात, पण म्हणून काय माणसाची अशी अवस्था व्हावी का ? मला नाही पटलं हे!!!!

     आणि शेवटी मला असं अगदी मनापासून वाटतं के हे नाटक ज्याला एवढी छान स्टोरी आहे ते या मंडळींना अधिक चांगल्या प्रकारे मांडता आलं असतं. मुद्द्गे फार सुरेख आणि रोजच्या आयुष्यातले आहेत पण तरीही ती अधिक चांगल्या पद्धतीने नाटकात सादर करता आले असते, आणि हे नाटक अधिक चांगल्या पद्धतीने खुलवता आलं असतं. कुठलाही part मनाला आतपर्यन्त स्पर्श करतो असं वाटत नाही.

     पण हे सगळं असलं तरी हे नाटक एकदा तरी निश्चित बघावं असं मला वाटतं. आणि "नाटक कंपनी" च्या सर्व group ला मनापासून दाद देऊन, आणि त्यांचं त्यांच्या out of box thinking साठी कौतुक करून  मी माझा पाल्हाळ आता थांबवतो......................... 









Saturday, July 23, 2011

पोलिसांच्या बाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतो का ?

    ते पैसे खा खा खातात. पण फक्त ते एकटेच खाणारे आहेत का ?

    रोज आपण पेपरामध्ये  किमान एक ना दोन बातम्या ज्या पोलिसांच्या गलथान कारभाराबद्दल भाष्य करतात  त्या वाचत असतो आणि त्यातही "सकाळ" सारखा सुशिक्षितांचा paper या कामात सदैव पुढे असतो. आपण कायमच पहात असतो, वाचत असतो कि हे police खा खा खातात आणि आपली कामं धड करत नाहीत.
 
    मी इथे कुठल्याही प्रकारे त्यांच्या निष्क्रियतेच समर्थन नाही करते पण आपण इतर काही गोष्टी लक्षात घेतो का ?? police खातात. मी हे अजिबात नाकारत नाहीये पण, मला एक सांगा आजच्या काळात कोण माणूस १०-१५ हजाराच्या नोकरीत आपला अख्खा ४ जणांचा संसार नीट प्रकारे चालवू शकेल ? आज १०-१५ हजार तर किरकोळीत फी असते मोठ्या मोठ्या शाळांची, परत college च्या फी बद्दल तर ना बोललेलंच बरं! आणि हो, हे सगळं रोज १४-१५ तास duty वर राहून आणि आठवड्यातले ७ ही दिवस. विना थकता, आणि थकलं तरी तक्रार तरी कोणाला करणार हो?

     अर्थात मी हे बोललो आहे ते साध्या post वरच्या पोलीसाबद्दल. वरच्या level चे किती कोडगे असतात ते काही वेगळ सांगायची गरज नाही.

    माझ्या या लिहिण्यामागचा अर्थ असा अजिबात नाही काही आपण या लोकांना त्यांनी मागितली की चिरीमिरी द्यावी किंवा लगेच १०० चे गांधी बाब त्यांच्या हातावर टेकवावेत पण ही सुद्धा बाजू आपण लक्षात घ्यायला पाहिजे, खरा तर आपण लक्षात घेण्यापेक्षा त्या हलकट राजकारण्यांनी याकडे नजर टाकायला पाहिजे (जर त्यांना "जनतेच्या सेवेतून वेळ मिळाला तर").

    प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात...................

Thursday, July 7, 2011

Facebook - Reason Why They Dominate and Others Failed!!

    Other Aspects Are Also Going to Play Major Role.

    Facebook has recently crossed 700 million users mark and it is growing by day. There seems to be no end as of now for such remarkable growth for Zuckerburg's company. Facebook has grown tremendously over the years and terms friend-unfriend have gone on to be so casual that people are using it in their normal life as well.

    Well leave the Facebook terms aside for now, only thing I started this post with mention of Facebook is because they have got competition in the name of Google+. Google+ has received warm welcome by users and people are OK with trying it. Not to forget that they are still in close beta (or whatever) it is. So we can say Google+ at least has managed to start on good note which many other social networking sites even failed to achieve.